शिवाजी महाराजांचे आचार-विचार, कर्तृत्व, कारकीर्द, साहस यांचा अभ्यास केला, तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या उद्योजकतेचा परिचय करून दिला आहे.
उद्योगधंदा, व्यवसाय उभा करण्यासाठी जी दूरदृष्टी आणि दृढनिष्ठा लागते, ती महाराजांकडे होती. संधीचा शोध घ्या, माणसे ओळखायला शिका अशा अनेक गोष्टी प्रा. जाधव यांनी या चरित्राच्या आधाराने सांगितल्या आहेत.
व्यवसायासाठी जागा कशी निवडावी, प्रोजेक्ट प्लॅनिंग कसे करावे, प्रोजेक्ट हळूहळू कसे वाढवायचे आदींची ओळख होते. स्वराज्य हाच व्यवसाय आहे, हे लक्षात घेऊन त्याचा विस्तार कसा करायचा, ताळेबंद कसा मांडायचा, दौलत हिशेब कसा मांडायचा, धोरण कसे आखायचे हे लक्षात आणून दिले आहे. प्रादेशिक समतोल. समतोल, समानता, कार्यक्षमता, उत्पन्न आदींसंबंधीचे मार्गदर्शन महाराजांच्या चरित्रातून मिळते.
प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : १८७
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)